महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्याविहारमधील निळकंठ किंग्डम आगीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू – जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई : विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत सुरक्षारक्षक उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (एन विभाग) उपायुक्तांची भेट घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या संपूर्ण प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यासाठी ॲड. मातेले यांनी पुढील मागण्या केल्या: संपूर्ण अग्निसुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा. अनधिकृत फेरबदल करणाऱ्या विकासक, व्यवस्थापक, मालक आणि गाळेधारकांवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे. सुरक्षारक्षकाच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृत सुरक्षारक्षकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करावा. निळकंठ बिजनेस पार्कमधील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करावी.

भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. मातेले यांनी दिला.

या वेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, तालुकाध्यक्ष अन्वर भाई दळवी, सरचिटणीस राहुल टिकेकर, युवक कार्याध्यक्ष अक्षय खिल्लारी आणि युवक मुंबई सरचिटणीस इमरान तडवी उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात