मुंबई

वरिष्ठ पत्रकार अभिमन्यु शितोळे यांचे निधन

मुंबई – नवभारत टाईम्सचे राजकीय संपादक अभिमन्यु शितोळे यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकालापासून आजारी होते. शुक्रवार, ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता माहिम येथील पी.डी. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अभिमन्यु शितोळे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिमन्यु शितोळे यांचा जन्म ११ सप्टेंबर १९७० रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. पत्रकारितेतील त्यांची सुरुवात ग्वाल्हेरमधूनच झाली. पुढे ते मुंबईत आले आणि ‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी टीव्ही ९ मध्ये काम केले आणि शेवटी नवभारत टाईम्समध्ये राजकीय संपादक म्हणून कार्यरत राहिले.

राजकीय पत्रकारितेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या बातम्यांमध्ये अचूकता, सडेतोड विश्लेषण आणि तटस्थ दृष्टिकोन कायम दिसून येत असे.

त्यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकारिता विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना एक निष्णात, अभ्यासू आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, “माझी त्यांच्याशी खूप जुनी ओळख होती. त्यांनी नेहमी अचूक आणि सडेतोड पत्रकारिता केली. त्यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट राजकीय पत्रकार हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव