महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसकेएमचा मोदी सरकारला इशारा : सी2+50% हमीभाव कायद्याशिवाय पर्याय नाही!

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सर्व पिकांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या C2+50% सूत्रावर हमीभाव आणि हमी खरेदी सुनिश्चित करणारा कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी केली. सरकारच्या राष्ट्रीय कृषी विपणन धोरणाच्या प्रस्तावावर आणि हमीभावावर केवळ अंशतः खरेदी करण्याच्या योजनेवर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, हा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला असल्याचे एसकेएमने स्पष्ट केले आहे.

कॉर्पोरेट लॉबीसाठी शेतकऱ्यांना धोका – एसकेएम

एसकेएमने मोदी सरकारवर कॉर्पोरेट लॉबीच्या दडपणाखाली काम करत असल्याचा आरोप केला आणि सरकार गेली ११ वर्षे शेतकऱ्यांना फसवत आहे असे सांगितले. “हमीभावाच्या कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने २०२१ मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या लेखी आश्वासनाचा सन्मान करण्याऐवजी, हे सरकार पुन्हा संधीसाधू खेळ खेळत आहे,” असे एसकेएमने म्हटले आहे.

तीन काळे कायदे पुन्हा आणण्याचा डाव

एसकेएमच्या म्हणण्यानुसार नवीन राष्ट्रीय कृषी विपणन धोरण म्हणजेच २०२१ मध्ये प्रचंड विरोधानंतर रद्द करण्यात आलेले ‘तीन काळे कायदे’ नव्याने लागू करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी हे धोरण कधीच लागू होऊ देणार नाहीत, असे एसकेएमने ठणकावले आहे.

२५-३०% हमीभाव खरेदीचा प्रस्ताव फसवणूक

सरकार २५-३०% पिकांचीच हमीभावावर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडत असून, ही योजना संपूर्णपणे शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणी असल्याचा आरोप एसकेएमने केला. हा प्रस्ताव शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क हिरावून घेण्यासाठी रचलेले कारस्थान असून, एसकेएम आणि भारतातील शेतकरी अशा योजनेला कधीच संमती देणार नाहीत, असे एसकेएमने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना एल्गाराचे आवाहन

एसकेएमने देशभरातील शेतकरी संघटनांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सरकारवर दबाव टाकण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “सरकारला पुन्हा गुडघे टेकण्यास भाग पाडून आमच्या मागण्या मान्य करायला लावू,” असा निर्धार एसकेएमने व्यक्त केला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात