महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात अवैध हुक्का पार्लरवर कठोर कारवाई; नियम अधिक कडक होणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यात २०१८ पासून हुक्का पार्लरवर कायदेशीर बंदी असली तरी ते पुन्हा सुरू झाल्याने आता हा कायदा अधिक कठोर करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अवैध हुक्का पार्लर दुसऱ्यांदा पकडल्यास संबंधित उपाहारगृहाचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला जाईल, तर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि संबंधित मालकावर अजामिनपात्र गुन्हा नोंदवला जाईल.

पुण्यातील अवैध हुक्का पार्लर संदर्भात आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांनी स्वतः कारवाई केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही, परंतु इतरांकडून हुक्का पार्लर उघडकीस आल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.

“हुक्का ओढणे ही फॅशन झाली आहे. काही ठिकाणी तंबाखू असते, तर काही ठिकाणी नसते. परंतु काही जण त्याचा गैरवापर करून नार्कोटिक पदार्थ चिलीममधून ओढतात. एका ठिकाणी तर शाळकरी मुलांना हुक्का ओढताना आढळले. त्यामुळेच कायदा आणखी कडक करण्याचे निर्देश देण्यात येतील,” असे फडणवीस म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, विश्वजित कदम आणि नाना पटोले यांनीही सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात बंदी असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा उल्लेख करत, त्याविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याचे सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात