ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेसमधून माझं निलंबन; जिचकरांचा धक्कादायक आरोप

नागपूर

काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर शिस्तपालन समितीने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून सहा वर्षांकरिता हकालपट्टी केली आहे. यानंतर जिचकरांनी पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर धक्कादायक आरोप केला आहे.

भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेस मधून माझे निलंबन करण्यात आलं आहे. मी नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो बहुजन विचार मंच द्वारा असो, शिवशाही महोत्सव द्वारा असो किंवा संविधान जागर या कार्यक्रमा द्वारा असो. लोक जोडण्या येवजी, लोक तोडण्याच काम सुरु आहे, अशा शब्दात जिचकरांनी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले नरेंद्र जिचकर?
माझ्यावरील बडतर्फीची कारवाई सूड बुद्धीने घेण्यात आली आहे. उदयपूरमध्ये नव संकल्प ठराव झाला हे त्यासंबंधित आहे. १२ ऑक्टोबरला एक बैठक झाली. यात नवजीवन संकल्प शिबिरात झालेला ठरावावर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी या नात्याने यावर बोलण्यासाठी मी उभा राहिलो होतो. त्यावेळी माझ्यावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांऐवजी मला नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसीला प्रत्युत्तर देताना मी तिथले सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. मात्र यानंतर माझचं निलंबन करण्यात आलं. ही कारवाई सूड बुद्धीने करण्यात आल्याचा आरोप जिचकरांनी केला आहे.

काँग्रेसचे विचार जनसामान्यात पोहोचवण्यासाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. नागपूरमध्ये हम तयार है या घोषणेअंतर्गत मोठी बैठक झाली. मात्र ही तयारी काँग्रेसला निवडून आणण्यासाठी की भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी आहे, असा मोठा आरोप जिचकरांनी केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात