महाराष्ट्र ताज्या बातम्या

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ; अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र खाती भाजपकडे ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं (PM Modi) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे . त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप( bjp) स्वतःकडेच ठेवणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक पण आमदार दांडी मारण्याच्या तयारीत

मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा पुरता धुव्वा उडवला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं( NCP Ajit Pawar Group )पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत ?

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangle Lok Sabha constituency )शिंदेसेनेचे धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) १४ हजार ७२३ मतांनी विजय झाले. त्यांनी १५ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला आहे . महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या १५ पैकी ७ जागा निवडून आल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिल्लीत हालचालींना वेग ; देवेंद्र फडणवीसांना भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारमधून ‘मोकळे’ करणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केंद्रात सरकार तयार करण्यास आमचा फॉर्म्युला तयार … सत्ता स्थापनेचा दावा करणार ; नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला आहे . महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले आहे . या निकालात राज्यात भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला आहे . भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवली !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ ; उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ; केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती !

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे […]

विश्लेषण ताज्या बातम्या

‘टायगर अभी जिंदा है!’ 10 पैकी ८ जागा ‘म्हाताऱ्या’ने जिंकून आणल्या

X : @vivekbhavsar मुंबई त्याच्याच पक्षातील नेते त्याला खाजगीत म्हातारा म्हणतात, तो 83 वर्षाचा तरुण आहे. त्याचा पक्ष फोडला, इतके वर्षे एक कुटुंब असलेले त्याचे घर फोडले, कुटुंबात फुट पाडली, पक्ष फोडला, ज्यांना राजकारणात आणले, महत्वाचे पद देऊन राजकीय आणि अर्थी दृष्ट्या सक्षम केले, असे चाळीसहून अधिक आमदार आणि खासदार सोडून गेले, पक्षाचे नाव आणि […]

विश्लेषण

मुंबई कोणाची? निष्ठावंत (मूळ) शिवसैनिकांचीच!

X : @vivekbhavsar मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमचंच सरकार येणार ; इंडिया आघाडी विजयी झाल्यास 48 तासात पंतप्रधान बनवू ; जयराम रमेश यांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर आता शेवटच्या सातव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे . देशातील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh )यांनी आमचं सरकार येणार आहे. आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे, असा दावा केला आहे . तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला( india […]