मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा पुरता धुव्वा उडवला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं( NCP Ajit Pawar Group )पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. पण लोकसभेतील इम्पॅक्ट बघता आता त्यांच्या या बैठकीला काही आमदार दांडी मारण्याची शक्यता आहे . आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का या चर्चाना रेकीय वर्तुळात उधाण आलं आहे .
राष्ट्र्वादीत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांना या लोकसभेत म्हणावं तितकं यश आलं नाही . राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार याना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे या पार्शभूमीवरच राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या कारणाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान काल दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला .इंडिया आघाडीची( india aaghadi )बैठक पार पडली मात्र या बैठकीला गैरहजर राहिल्यानं ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान या लोकसभा निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. आता आगामी होणाऱ्या विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.