Maharashtra Forest Minister Ganesh Naik addressing the Legislative Assembly while announcing measures to strengthen forest fire management and study advanced Australian technology. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वणव्यांविरोधात ‘ऑस्ट्रेलियन मॉडेल’; वनविभागाचे विशेष पथक जाणार ऑस्ट्रेलियात

वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील जंगलांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणाऱ्या वणव्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक वणवा व्यवस्थापन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उपग्रहाधारित निरीक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक नियंत्रण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाचे विशेष अधिकारी पथक ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार असल्याची घोषणा […]

Editorial illustration showing extreme heatwave and weak monsoon conditions affecting Indian agriculture महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!

‘सुपर एल निनो’मुळे १८७७ नंतरच्या भीषण हवामान संकटाची भीती देश एका गंभीर हवामान बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानुसार, यंदा भारताला केवळ एल निनोचाच नव्हे, तर अत्यंत शक्तिशाली अशा ‘सुपर एल निनो’चा सामना करावा लागू शकतो. त्याचा थेट परिणाम आगामी नैऋत्य मान्सून, खरीप हंगाम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर […]

Environmental activist Dhiraj Parab speaking on environmental destruction in Konkan महाराष्ट्र ताज्या बातम्या

निसर्ग जीवन देतो, पण नोट आणि वोट देत नसल्याने सर्वाधिक धोक्यात — धीरज परब

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे नव्हे, तर अस्तित्वातील झाडे वाचवण्यासाठी जनचळवळ उभी राहण्याची गर कुडाळ: “आजच्या बदललेल्या व्यवस्थेत नोट आणि वोट या दोन गोष्टींनाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निसर्ग आणि शुद्ध पर्यावरण आपल्याला जीवन देतात, मात्र त्यांच्याकडून नोट आणि वोट मिळत नसल्याने निसर्गच सर्वाधिक धोक्यात आला आहे,” असे स्पष्ट मत पर्यावरण कार्यकर्ते Dhiraj Parab यांनी व्यक्त […]

Pankaja Munde speaking in Maharashtra Assembly on Mazi Vasundhara campaign and climate change initiatives महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा’ मोहीम वेगात; २०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक, कर्करोग तपासणीला गती

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून “माझी वसुंधरा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील २८,३२८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, सध्याचे दशक हे इतिहासातील सर्वात उष्ण दशक ठरत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले तापमान आणि वाढते कार्बन […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश

मुंबई : ब्राझीलमधील बेलेम शहरात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेत (Conference of Parties – COP30) भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळात महाराष्ट्रातील भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश करण्यात आला आहे. COP30 परिषदेमध्ये जगभरातील देश हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र आले आहेत. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामान- अनुकूल धोरणे स्वीकारणे, आणि आवश्यक […]