Chief Minister Devendra Fadnavis attends the launch of the Bharat Taxi cooperative mobility service during an event in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘भारत टॅक्सी’चा महाराष्ट्रात शुभारंभ; सहकार मॉडेलमधून ३ ते ४ हजार रोजगारांचा सरकारचा दावा

चालक भागधारक असलेले सहकारी मॉडेल; सर्ज प्रायसिंग नसल्याचा दावा मुंबई : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा महाराष्ट्रात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली आणि गुजरातनंतर महाराष्ट्र हा या उपक्रमाची अंमलबजावणी करणारा तिसरा राज्य ठरला […]

Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde extends birthday greetings to Chief Minister Devendra Fadnavis through an official social media post. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘बिग डी’चा वाढदिवस आणि शिंदेंच्या शुभेच्छांची चर्चा; महायुतीत नव्या संकेतांची चर्चा?

फडणवीसांविषयी शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव; राजकीय वर्तुळात विविध अर्थ लावले जात आहेत मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून दिलेल्या शुभेच्छा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. शुभेच्छांमध्ये वापरण्यात आलेली आदरयुक्त, आत्मीय आणि गौरवपूर्ण भाषा ही केवळ औपचारिक शुभेच्छा आहे की त्यामागे काही व्यापक राजकीय संदेश दडलेला आहे, […]

FDA food safety inspectors inspect a restaurant kitchen while citizens document hygiene violations, highlighting Maharashtra’s food safety enforcement drive. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंढे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एफडीएकडे तक्रारींचा ओघ

मुंबई-पुण्यातून सर्वाधिक तक्रारी; अस्वच्छ खाद्य आस्थापनांविरोधात एफडीएची कारवाई अधिक वेगवान मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना अस्वच्छ, निकृष्ट आणि आरोग्यास धोकादायक अन्नाविरोधात थेट तक्रार करण्याचे केलेले आवाहन राज्यभरात प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या आवाहनानंतर एफडीएच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामध्ये मुंबई आणि पुणे […]

महायुती सरकारमधील महामंडळ नियुक्त्या, सत्तासंतुलन आणि संभाव्य नव्या राजकीय समीकरणांचे प्रतीकात्मक संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळ वाटपात ‘पवार फॅक्टर’चा प्रभाव…?

४८-२९-२२ फॉर्म्युला बदलणार? शरद पवार गटाच्या संभाव्य सत्ताप्रवेशाच्या चर्चेमुळे महायुतीचे नवे राजकीय गणित नियुक्त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई: महायुती सरकारमधील दीड वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महामंडळांच्या राजकीय नियुक्त्या लवकरच जाहीर होतील, अशी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील नव्या घडामोडींमुळे ही प्रक्रिया पुन्हा विलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राष्ट्रवादी […]

Investigative journalist holding RTI applications before locked government filing cabinets symbolising transparency challenges in Maharashtra’s Energy Department and public administration. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाला RTI चे वावडे 

महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना पारदर्शक प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. महावितरण आणि ऊर्जा विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवताना आलेल्या अनुभवांवर आधारित विवेक भावसार यांचे हे संपादकीय प्रशासनातील उत्तरदायित्व आणि RTI व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विकास, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार, मत्स्यपालन, डिजिटल नोंदणी आणि मत्स्य प्रक्रिया केंद्रांचे प्रतीकात्मक दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता राज्यातील ‘मत्स्यसंपदा’वर महायुती सरकारचा मास्टरस्ट्रोक…?

प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे, प्रशिक्षण केंद्रांना गती; किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांपर्यंत योजना पोहोचविण्याची तयारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना ‘मिशन मोड’चे निर्देश मुंबई : राज्यातील किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा आणि मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ मिशन मोडमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रत्येक […]

महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन भरती परीक्षा, सायबर सुरक्षा, बायोमेट्रिक पडताळणी आणि पेपरफुटी रोखण्यासाठीच्या डिजिटल व्यवस्थेचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“पेपरफुटी”ला सरकारचा अखेर ‘डिजिटल’ लगाम…?

राज्यातील सर्व शासकीय परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन करण्याची तयारी; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती दोन महिन्यांत अहवाल; भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांचे संकेत मुंबई : राज्यातील भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार आणि त्यामुळे लाखो उमेदवारांचा ढासळलेला विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व भरती आणि स्पर्धा परीक्षा टप्प्याटप्प्याने […]

Chief Minister Devendra Fadnavis announcing the agricultural electricity bill waiver package at a farmers' gathering in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

४८ हजार कोटींच्या कृषी वीज थकबाकी माफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलास्याची शक्यता

अंमलबजावणीचा आराखडा, पात्रतेचे निकष आणि निधी व्यवस्थेकडे राज्याचे लक्ष मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील कृषी वीजग्राहकांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीज थकबाकी माफीची घोषणा केली. शासन निर्णय (GR) आणि अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाचा लाभ राज्यातील अंदाजे ४० ते ४५ लाख कृषी वीजग्राहकांना मिळू शकतो, असा अंदाज ऊर्जा क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला […]

महाराष्ट्रातील आधुनिक शहर विकासाचे प्रतीकात्मक चित्र, मेट्रो रेल्वे, उंच इमारती, स्मार्ट रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि अर्बन चॅलेंज फंड दर्शवणारे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

९० हजार कोटींचा ‘अर्बन चॅलेंज’!

महाराष्ट्रातील शहरांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा ब्लूप्रिंट पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना गती; केंद्र, राज्य आणि बाजारातून निधी उभारणीचा आराखडा मुंबई– महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सोमवारी गती दिली. पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]