काँग्रेसच्या बैठकीतून 7 आमदार गायब, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…
मुंबई काँग्रेसकडून आज विधिमंडळात आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे ३६ आमदार उपस्थित होते. बैठक संपली तरी ७ आमदार आलेच नाहीत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणकोणते आमदार त्यांच्यासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू असताना आता विधिमंडळाच्या बैठकीत ७ आमदारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. […]









