ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ना पार्थ पवार, ना बाबा सिद्दीकी, ना सुनील तटकरे; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी अनपेक्षित नावाची घोषणा!

मुंबई

आज भाजप, शिवसेना शिंदे आणि काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाचं नाव जाहीर करणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. अखेर सस्पेंस संपला असून अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आताच राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात आलेले बाबा सिद्दीकी, सुनील तटकरे, पार्थ पवार, समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अजित पवार गटाने सरप्राईज देत राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर केलं आहे. पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पटेलांची राज्यसभेची टर्म संपायला अद्याप ३ वर्षे
प्रफुल्ल पटेल राज्यसभेत असून त्यांचा कार्यकाळ संपायला अद्याप तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पटेलांना खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मात्र पक्षात इतर चेहरे असतानाही पक्षाने पटेलांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही पुन्हा त्यांचचं नाव का जाहीर केलं, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे हा निर्णय मोठा धक्कादायक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर मुंबईतील काँग्रेसचे निष्ठावंत आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी तिकिट देण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेत जाणाऱ्या सहा उमेदवारांची नावं आली समोर
२ मेधा कुलकर्णी
३ डॉ. अजित गोपछडे
४ मिलिंद देवरा
५ चंद्रकांत हंडोरे
६ प्रफुल्ल पटेल

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात