ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मी मेलो तर या सरकारला सोडू नका’ मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन, आज उपोषणाचा पाचवा दिवस

जालना

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे पाटलांना जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना भावनिक आवाहन केलं आहे.

‘मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला सोडू नका. येत्या १८ किंवा १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ.’ अशा शब्दात मनोज जरांगेंनी इशारा दिला आहे.

काल जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्यानंतर आंतरवाली सराटीत मराठा बांधव जमा होण्यास सुरुवात झाली होती. जरांगे पाटलांनी काही झाल्यास याला सरकार जबाबदार असल्याचं मराठा बांधवांकडून सांगण्यात येत होतं.

मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीवरून सरकारने राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाची विशेष बैठक बोलावण्याची शिफारस केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात