राष्ट्रीय ताज्या बातम्या

कोणतीच तपास यंत्रणा स्वतंत्र राहिली नाही…..?

X: @therajkaran ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप……! मुंबई, दि.२४(अनंत नलावडे)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या बारामती ऍग्रो कंपनीतल्या कथित गैर व्यवहार प्रकरणी ईडी कडून नोटीस बजावल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत,’ […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात काँग्रेस व मविआ जास्तीत जास्त जागा जिंकेल…? 

X: @therajkaran काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा विश्वास….!  आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असून सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू,असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.  आज देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

बिल्कीस बानो प्रकरणात मोठी बातमी, गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले, की गुन्हेगारी थांबवण्यासाठी शिक्षा दिली जाते. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावं लागेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज (8 जानेवारी) आपला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्य सचिव डॉ नितीन करीर ॲक्शन मोडवर

सर्वच विभागांची घेतली झाडाझडती..! X : @NalavadeAnant मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांनी १ जानेवारी रोजी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रधान सचिव, सचिव व कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. येत्या काही दिवसांत प्रशासनात मोठ्या प्रमाणावर अदलाबदल घडण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नावं न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. त्याचे झाले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा

X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय आपले ‘महानंद’ वाचविण्यात आलेले अपयश कबूल करणारा, गुजरातच्या ‘अमूल’ला महाराष्ट्रात विस्ताराची संधी उपलब्ध करून देऊन गुजरातच्या व केंद्राच्या राज्यकर्त्यांना खुश करणारा  व राज्यातील सहकाराला तसेच शेतकरी हिताला जबरदस्त धक्का पोहचविणारा निर्णय आहे, […]

महाराष्ट्र

आता एकच लक्ष….. मिशन ४८

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फुंकले प्रचाराचे रणशिंग…! X: @NalavadeAnant मुंबई: राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी राज्यभर शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा […]

महाराष्ट्र

तिजोरीत पैसे नसताना नव्याने १८ हजार ३९९ कोटी द्यायचे कुठून?

राज्याचे अर्थ खाते विवंचनेत…..!  X: @NalavadeAnant मुंबई: एकीकडे ज्या कंत्राटदारांनी राज्यांतील विविध विकास प्रकल्प महायुती सरकारच्या भरवशावर गेल्या वर्ष सव्वा वर्षात स्वबळावर पूर्ण केले, त्यांच्या कामांची तब्बल १५ ते २० हजार कोटींची बिले देण्यास या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिले कशी अदा करायची या विवंचनेत अर्थ खाते सापडले आहे. आगामी लोकसभा निवडणुक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]

महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचा सोमवारी नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला […]