ताज्या बातम्या महाराष्ट्र

हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा

X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय आपले ‘महानंद’ वाचविण्यात आलेले अपयश कबूल करणारा, गुजरातच्या ‘अमूल’ला महाराष्ट्रात विस्ताराची संधी उपलब्ध करून देऊन गुजरातच्या व केंद्राच्या राज्यकर्त्यांना खुश करणारा  व राज्यातील सहकाराला तसेच शेतकरी हिताला जबरदस्त धक्का पोहचविणारा निर्णय आहे, […]

महाराष्ट्र

आता एकच लक्ष….. मिशन ४८

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फुंकले प्रचाराचे रणशिंग…! X: @NalavadeAnant मुंबई: राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी राज्यभर शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा […]

महाराष्ट्र

तिजोरीत पैसे नसताना नव्याने १८ हजार ३९९ कोटी द्यायचे कुठून?

राज्याचे अर्थ खाते विवंचनेत…..!  X: @NalavadeAnant मुंबई: एकीकडे ज्या कंत्राटदारांनी राज्यांतील विविध विकास प्रकल्प महायुती सरकारच्या भरवशावर गेल्या वर्ष सव्वा वर्षात स्वबळावर पूर्ण केले, त्यांच्या कामांची तब्बल १५ ते २० हजार कोटींची बिले देण्यास या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिले कशी अदा करायची या विवंचनेत अर्थ खाते सापडले आहे. आगामी लोकसभा निवडणुक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]

महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचा सोमवारी नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरोधकांच्या अनुपस्थितीत वादग्रस्त ऑनलाईन कॅसिनो विधेयकाला विधानसभेची मंजुरी

X : @NalavadeAnant नागपूर: विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षाने सभात्याग केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयके घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी येथे तीव्र नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांच्या कार्यपद्धतीवर ही नाराजी व्यक्त करण्यात आली. विरोधकांनी सभात्याग (walk out by opposition in […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशद्रोहयाच्या मांडीला मांडी लावून बसले; अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

X: @therajkaran नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सदस्य माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसण्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी सदस्यांनीच मलिक यांच्या विरोधात पूर्वी केलेल्या वक्तव्यांचे स्मरण करून दिले. यावर गृहमंत्री […]