महाराष्ट्रातील आधुनिक शहर विकासाचे प्रतीकात्मक चित्र, मेट्रो रेल्वे, उंच इमारती, स्मार्ट रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि अर्बन चॅलेंज फंड दर्शवणारे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

९० हजार कोटींचा ‘अर्बन चॅलेंज’!

महाराष्ट्रातील शहरांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा ब्लूप्रिंट पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना गती; केंद्र, राज्य आणि बाजारातून निधी उभारणीचा आराखडा मुंबई– महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सोमवारी गती दिली. पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]

विधानसभेत मुंबईच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाबाबत माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणीसुरक्षेसाठी ४,०७७ कोटींचा ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्प; मनोरीत समुद्राच्या पाण्यापासून मिळणार गोडे पाणी

२०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; ४८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पश्चिम उपनगरातील मालाड येथील मनोरी येथे ४,०७७ कोटी रुपयांचा २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेचा समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण (Desalination) प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुंबईला […]

Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narwekar addressing the House during a discussion on recurring power outages in South Mumbai and BEST's electricity distribution network. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दक्षिण मुंबईतील वारंवार वीज खंडित होण्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर संतप्त; ‘प्रश्न सुटला नाही तर बेस्ट महाव्यवस्थापकांना सभागृहात बोलावू’

मुंबई: दक्षिण मुंबईसह बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर बेस्टचे महाव्यवस्थापकांना थेट विधानसभेत बोलावून जाब विचारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बुधवारी आपल्या दालनात बेस्ट […]

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis receiving memorandum from Municipal Mazdoor Union representatives regarding housing scheme for sanitation workers in Mumbai ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील सफाई कामगारांना 50% घरे मालकी हक्काने; फडणवीस यांचे मोठे आश्वासन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल…….!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास….. मुंबई– महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक असून कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल.शिवाय कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईकरांसाठी मोठी दिलासा योजना: ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – अनेक वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने आर्थिक, कायदेशीर आणि व्यवहारातील अडचणींना सामोरे जाणाऱ्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने ‘सुधारित भोगवटा अभय योजना’ लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ही घोषणा करताना सांगितले की या निर्णयाचा थेट दहा लाखांहून अधिक मुंबईकरांना लाभ होणार आहे. विधानसभेत निवेदन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मुंबईला ‘पागडीमुक्त’ करण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; स्वतंत्र नियमावली येणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

नागपूर – मुंबईला पागडीमुक्त करण्यासाठी आणि पागडी इमारतींचा न्याय्य, सुयोग्य आणि जलद पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली तयार करत असल्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. “भाडेकरू आणि घरमालक — दोघांच्याही हक्कांचे संरक्षण केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितले, मुंबईतील सुमारे १९,०००+ सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रक्रियेला गती; २५ हजार झोपडपट्ट्यांसाठी नवे धोरण — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनजागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने नवे धोरण तयार केले असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या धोरणामुळे उद्यानातील मौल्यवान वनक्षेत्र पुन्हा मोकळे होऊन संवर्धनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितले की, उद्यानातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्विकासाला गती; नियमावलीत फेरबदल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या, धोकादायक चाळी आणि वस्त्यांच्या पुनर्विकासाला आता झपाट्याने गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कापड गिरण्यांच्या जमिनीवरील बहुसंख्य चाळी अत्यंत जर्जर स्थितीत असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तातडीने पुनर्विकास आवश्यक आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री […]