महाराष्ट्र ताज्या बातम्या

औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण नमुने घेऊन कारवाई करा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई – कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त मोहिम राबवावी, प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक ती कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींचा सहभागही घ्यावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

पुण्यातील अल्कली अमाइन्स कंपनीतील नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उद्योग, पर्यावरण व कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार राहुल कुल आणि एमआयडीसीमधील अधिकारी उपस्थित होते.

कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर रासायनिक उद्योग असल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना गरजेच्या असून, स्वतंत्र पथक नेमून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करावी, असे आदेशही मंत्री फुंडकर यांनी दिले.

आमदार राहुल कुल यांनी CETP (कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) संदर्भात प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, जे उद्योग प्रदूषित पाणी निर्माण करतात, तेच CETP चालवत असल्यामुळे प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उभे राहते. यावर धोरणात्मक फेरआढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी “महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६” अंतर्गत फायर ऑडिट नियम तात्काळ लागू करण्यासाठी उद्योग विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही कामगार मंत्र्यांनी दिल्या.

प्रदूषण आणि सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असल्यामुळे आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात