महाराष्ट्र ताज्या बातम्या

अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई – पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

कामगार, उद्योग आणि पर्यावरण विभागाची संयुक्त बैठक आज मंत्रालयात मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आमदार राहुल कुल, संबंधित विभागांचे अधिकारी, रासायनिक उद्योगांचे प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री फुंडकर यांनी म्हटले की, कुरकुंभ परिसरात बहुसंख्य रासायनिक उद्योग कार्यरत असल्याने संभाव्य अपघात रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करण्यात यावी.

MIDC व प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त मोहिम राबवून प्रदूषणाचे नमुने घ्यावेत आणि ग्रामपंचायतींचा सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत आमदार राहुल कुल यांनी CETP संदर्भात चिंता व्यक्त करताना नमूद केले की, प्रदूषित पाणी निर्माण करणारेच उद्योग CETP चालवतात, त्यामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राहत नाही. यावर धोरणात्मक फेरआढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही मंत्र्यांनी दिले.

मंत्री फुंडकर यांनी फायर ऑडिटसाठी 2006 च्या ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम’ अंतर्गत नियम तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी उद्योग विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही दिल्या.

कामगार विभागाकडे प्रदूषण आणि सांडपाणी नियंत्रणाची थेट जबाबदारी नसल्याने, त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात