ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाताचा मटनाचा वास गेला असेल…’ म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ता शिल्पा बोडखे यांचा राजीनामा

मुंबई

उद्धव ठाकरे गटाच्या विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता म्हणून काम पाहणाऱ्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत कलहाचं कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित माहिती दिली.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच. पुन्हा नागपूरात येवून सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा.

त्या पुढे लिहितात, मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत, रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या.

शिल्पा बोडखे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रानुसार, पक्षांतर्गत महिलांमध्ये झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर येत आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात