महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : मंत्री दीपक केसरकर यांची टीका

X: @therajkaran

मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेते मुख्यमंत्री यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षप्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात कडवट टिकास्त्र सोडले. त्याला सायंकाळी मंत्रालय वार्ताहर कक्षात घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांनी उत्तर दिले. विधानसभा अध्यक्षांनी आरोपींना भेटणे चुकीचे, असे भाष्य माजी मुख्यमंत्री यांनी करणे चुकीचे आहे. या भेटीत कोणतीही लपवाछपवी नाही. ज्यांची बाजू लंगडी असते, त्यांनाच भिंती वाटते. आम्ही नेहमीच त्यांचा मान ठेवला आहे. स्वत:च्या पक्ष घटनेत परस्पर बदल करणाऱ्यांनी थोडा पेशन्स ठेवावा, अशी मल्लीनाथीही केसरकर यांनी केली.

ज्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यांच्यावर दुसरा व्हिप लागू होत नाही. ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांना कोणत्याही पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, याकडे दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात