महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकृत कुणाल कामरा यांचा खरा आका मातोश्रीवर – संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उद्धव ठाकरे गटाच्या (उबाठा) सुपारीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विडंबनात्मक व अपमानजनक गाणे तयार केले आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. कामरा हा संजय राऊत यांचा निकटवर्तीय असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीवरून आर्थिक मदत मिळाल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच कामराने हे विकृत गाणे तयार केल्याचा आरोप केला. तसेच, कुणाल कामरा राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही घनिष्ठ संबंध ठेवतो, असे गंभीर दावे त्यांनी केले.

संजय निरुपम म्हणाले, “संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर कुणाल कामरा करत आहे. स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली शिव्या देणे आणि लोकप्रतिनिधींची बदनामी करणे ही कला नाही, तर विकृती आहे.”

त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. शिवसैनिकच कामराला योग्य धडा शिकवतील.”

संजय निरुपम पुढे म्हणाले, “२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केला होता. हा निर्णय जनतेने स्वीकारला आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरघोस मतदान केले.”

संजय निरुपम यांनी मोठा दावा करत सांगितले की, “कामराच्या विकृत गाण्याला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा आहे. मातोश्रीवरून त्याला पैसे देण्यात आले होते, जेणेकरून उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करता येईल.”

ते पुढे म्हणाले, “कामरा हा वामपंथी विचारधारेचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग बनला आहे. तो राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’तही सहभागी झाला होता. तसेच, संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही त्याचे जवळचे संबंध आहेत.”

“शिवसेना आपल्या नेत्याचा अपमान सहन करणार नाही. जर कामराने तात्काळ माफी मागितली नाही, तर शिवसैनिक त्याला कडक उत्तर देतील,” असा थेट इशारा संजय निरुपम यांनी दिला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात