महाराष्ट्र ताज्या बातम्या

… हे तर चॅम्पियन बजेट…! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकोद्गार

मुंबई – राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प ‘चॅम्पियन बजेट’ असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधांचा समतोल राखत, सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड सुरू असून, हा प्रवास थांबणार नाही, असा निर्धार या अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते, पूल, बंदरे आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी आघाडीवर राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची दीड ट्रिलियन डॉलर्स योगदान क्षमता असून, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल, असेही शिंदे यांनी नमूद केले.

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे सांगत, या योजनेसाठी अर्थसंकल्पात ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “गरिब आणि दुर्बल महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीही तरतुदी केल्या आहेत,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

“विकास हाच आमचा अजेंडा असून, महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात