ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

X : @therajkaran

मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ  कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली‌. सरकारने जातनिहाय जनगणना (caste wise census) का केली नाही असा सवाल करत आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षण (Maratha reservation) मुद्यावर सरकारची भूमीका स्पष्ट नाही. राज्यात तणाव आहे.  सरकार आम्हाला, जनतेलाही विश्वासात घेत नाही. अधिवेशन सुरू असतानाही सरकारने सभागृहात कोणतीही भूमीका मांडली नाही.  बहुमत असल्याने मराठा समाजाचे प्रश्न सरकारनेच सोडविले पाहिजेत. मराठा –ओबीसी समाजात (Conflict between Maratha – OBC community) सरकारने तेढ निर्माण करू नये.  दोन्ही समाजाचे समाधान करावे.  

वडेट्टीवार म्हणाले, येथील उद्योगधंदे भाजपशासित राज्यातच का जातात. बेरोजगारीला (unemployment) सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्या होत आहेत. 4 हजार तलाठी पदासाठी 18 लाख अर्ज येतात, यावरून वास्तव स्पष्ट होते. दाओसचा करार हा एक जुमलाच आहे. सरकारने दाओसबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj memorial), इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar Memorial) यांच्या स्मारकाचे काम महायुती सरकार करू शकले नाही. पुरोगामी राज्यात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश होत आहे. समूह शाळांच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. मुलींना पारंपरिक शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुकीत )Lok Sabha elections) पराभव पत्करावा लागल्याने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. आनंदाचा शिधा योजना फक्त कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी आहे. राज्याला ड्रगचा विळखा पडला, असे हल्लेही त्यांनी केले. धुळे, बीड, मुंबई, नागपूर येथील लोकसभा निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाला. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.  

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Ram) भूमीत भाजपाचा पराभव झाला. प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने तुम्ही मतं मागता म्हणून पवनपुत्र हनुमानाने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर गदा मारली असा टोलाही वडेट्टीवार यांनी हाणला. 

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात