महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यापीठांनी परीक्षा आणि पदवीदान समारंभाची तारीख काटेकोरपणे पाळावी: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई – देशातील युवकांनी समर्पित भावनेने कार्य केल्यास, विकसित भारताचे उद्दिष्ट २०४७ च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य करता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मंगळवारी (ता. २५) मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच, विद्यापीठांनी शेवटच्या परीक्षेनंतर एक महिन्याच्या आत पदवीदान समारंभ आयोजित करावा, अशी सूचना केली.

राज्यपालांनी स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील सर्व रेल्वे स्थानकं आणि ट्रॅक स्वच्छ झाल्याचे अधोरेखित केले. विद्यापीठांनीही स्वच्छता मोहीम कायम ठेवावी व शैक्षणिक परिसर स्वच्छ राखावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यपाल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर ठराविक ध्येय ठेवावे आणि ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. जीवनात शिस्त आणि नीतिमूल्यांचे पालन केल्यास कोणतीही शक्ती तुमच्या यशाला अडथळा आणू शकत नाही.”

स्वतःच्या अनुभवावर प्रकाश टाकत, ते म्हणाले, “मी विद्यार्थी असताना नियमित टेबल टेनिस आणि मैदानी खेळ खेळायचो. त्यामुळे आज ६८ व्या वर्षीही माझे आरोग्य उत्तम आहे. विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.”

दीक्षांत समारंभातील ठळक बाबी
• इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी दीक्षांत भाषण दिले.
• पीएचडी, पदव्युत्तर आणि पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
• ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी आणि निमंत्रित उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात