ताज्या बातम्या महाराष्ट्र

पारंपरिक मच्छीमारांना पिक विमा संरक्षण मिळणार? : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई: पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे पिक विमा संरक्षण देता येईल का, याचा सरकार विचार करणार आहे, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.

विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी मच्छीमारांच्या समस्या उपस्थित केल्या होत्या. त्यावर उत्तर देताना मंत्री राणे म्हणाले की, शासन नेहमीच नियमानुसार मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या पाठीशी आहे. मात्र, एलईडी वापरून पर्स सीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना कोणतीही मदत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून नियमित मच्छीमारांना १००% डिझेल परतावा दिला जात आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत ११९.९८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रलंबित असलेला डिझेल परतावा देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली असून, डिझेल परताव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले.

याशिवाय, अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मच्छीमारांच्या डिझेल परताव्याबाबत विशेष बैठक घेतली जाईल, असेही मंत्री राणे यांनी जाहीर केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात