महाराष्ट्र ताज्या बातम्या

यशराज भारतीय सन्मान 2025: निस्वार्थ सेवेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव

मुंबई: यशराज भारतीय सन्मान 2025 चा आभार समारंभ हा अशा संवेदनशील आणि समाजासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्या हिरकणींना समर्पित आहे, ज्यांनी आपल्या धैर्य, संवेदनशीलता आणि सातत्याने समाजाच्या तळागाळात खरे बदल घडवले आहेत. या सन्मानासाठी निवडले गेलेले व्यक्ती व संस्था ही सेवा आणि माणुसकीचे खरे प्रतीक आहेत. या निवडीसाठी वर्षभर तपशीलवार प्रक्रिया राबवण्यात आली.

यशराज भारती सन्मान हा यशराज रिसर्च फाउंडेशन व सल्लागार समिती यांच्या संयुक्त पुढाकारातून स्थापन करण्यात आला आहे. या समितीचं नेतृत्व अध्यक्षा सौ. दीपाली भानुशाली करत असून, मार्गदर्शन माजी लोकपाल सदस्य व माजी मुख्य सचिव (महाराष्ट्र) दिनेशकुमार जैन यांनी केलं आहे. सल्लागार मंडळात हसीब द्राबू (अर्थतज्ज्ञ व माजी अर्थमंत्री, जम्मू-काश्मीर), जयेश पटेल (गांधीवादी व साबरमती आश्रम ट्रस्टी), ओम पोर्वाल (संचालक, CFML), एस. एस. मुंद्रा (माजी उपराज्यपाल, रिझर्व्ह बँक), सय्यद रझा हैदर (चित्रपट निर्माते व अध्यक्ष, SIKSHA संस्था), आणि वेद आर्य (संस्थापक, सृजन व बुद्ध फेलोशिप) यांचा समावेश आहे.

या वर्षीचा आभार समारंभ २० एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम त्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आहे, जे प्रकाशझोतात नसले तरी समाज घडवण्यात मोठं योगदान देत असतात.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन स्वीकारणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे G20 शेरपा अमिताभ कांत आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ. श्वेता शेलगावकर करतील. कार्यक्रमात सौ. शर्वरी जामेनिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून एक मनमोहक शास्त्रीय कथक नृत्यप्रस्तुती सादर केली जाईल.

या वर्षीचे यशराज भारती सन्मान प्राप्तकर्ते—ज्यांची घोषणा लवकरच होणार आहे—यांनी आरोग्यसेवा, शाश्वत विकास, नैतिक प्रशासन आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदान दिले आहे. हा समारंभ त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील असामान्य योगदानाचा आणि निःस्वार्थ नेतृत्वाच्या शांत पण प्रभावी ताकदीचा गौरव करण्यासाठी आयोजित केला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात