ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या ” ; छगन भुजबळांचा पंकजा मुडेंना टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकमधून मी प्रीतम मुंडेंना उभी करेन असं वक्तव्य केल होत . त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांनी त्यांना तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या असे म्हणत टोला दिला आहे .

दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Manohar Sonwane) निवडणूक लढवत आहेत. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीका केली. तसेच या निवडणुकीत आपल्यासमोर खरे आव्हान कोणते आहे, यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.त्यांनी या मतदारसंघातुन प्रीतम मुंडेंना उमदेवार देण्याच्या केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे .

भुजबळ म्हणाले, पंकजा मुडेंनी बीडच्या निवडणुकीवर लक्ष द्यावं. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत ही अडचण नाही. उलट खूप उमेदवार आहेत, ही अडचण आहे. प्रत्येक पक्षाकडे चांगला उमेदवार आहे. प्रत्येक समाजाचा उमेदवार आहे. खूप आहेत इकडे उमेदवार, तुम्ही बीडवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करा. कुठल्याही परिस्थितीत निवडून या, असं म्हणत भुजबळांनी पंकजा मुंडेंना घरचा आहेर दिला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात