मुंबई — महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असताना काँग्रेस नेते Sachin Sawant यांनी भाजपवर थेट आणि तीव्र हल्ला चढवत, २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकाच्या मागील राजकीय गणित उघड केल्याचा दावा केला आहे. सावंत यांनी स्पष्ट आरोप केला की, महिला आरक्षण हे प्रत्यक्षात तातडीने लागू करता आले असते, मात्र जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या अटी घालून ते मुद्दाम पुढे ढकलण्यात आले. “विद्यमान ५४३ जागांमधूनच ३३ टक्के आरक्षण लागू करणे शक्य असताना ते टाळले गेले, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यमान खासदारांना जागा गमवावी लागली असती,” असा थेट आरोप त्यांनी केला.
सावंत यांनी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला तो परिसीमनावर. त्यांच्या मते, प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर भारतातील राज्यांना disproportionately अधिक राजकीय वजन मिळू शकते. उत्तर प्रदेश: ८० वरून १२०, बिहार: ४० वरून ६०, मध्य प्रदेश: २९ वरून ४७ तर दक्षिणेकडील राज्यांची वाढ तुलनेने मर्यादित राहील. “हे केवळ आकड्यांचे गणित नाही — हा राष्ट्रीय सत्तासंतुलन बदलण्याचा प्रयत्न आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सावंत यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला — परिसीमनाचा निर्णय संसदेकडे केंद्रीत करणे. “राज्यांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम करणारे निर्णय जर केंद्रानेच ठरवले, तर तो संघराज्य व्यवस्थेवर आघात नाही का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
महिला आरक्षणाचा मुद्दा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे आणला गेल्याचा आरोप करत सावंत म्हणाले की, २०२३ मध्ये १० वर्षांची अट, २०२४ निवडणुकीत अंमलबजावणी नाही, “महिला सशक्तीकरण हा मुद्दा की राजकीय स्टंट?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सावंत यांनी भाजपच्या महिला प्रतिनिधित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले: २४० खासदारांपैकी केवळ ३१ महिला, १६५४ आमदारांपैकी फक्त १६४ महिला, भाजपकडून केवळ १ महिला मुख्यमंत्री. “हेच वास्तव असेल, तर महिला सक्षमीकरणाचा दावा किती खरा?” असा सवाल त्यांनी केला.
राजकीय लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. महिला आरक्षण, जनगणना आणि परिसीमन या तीन मुद्द्यांभोवती आता राष्ट्रीय राजकारणाची नवीन रेषा आखली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हा वाद केवळ आरक्षणाचा नाही, तर भारताच्या राजकीय सत्तासंतुलनाचा आहे
The Rajkaran STRONG NOTE
महिला आरक्षण हा भावनिक मुद्दा आहे, परिसीमन हा सत्तेचा गणिती मुद्दा आहे. दोन्ही एकत्र आल्यावर —राजकारण सर्वात तीव्र होतं.

