महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा महायुती सरकारवर चौफेर हल्ला; ‘मिसिंग लिंक’पासून राम मंदिर निधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. मराठी युवकांना रोजगार, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, राम मंदिरातील कथित आर्थिक अनियमितता, मुंबईतील पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती, कंत्राटी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

२००८ मधील रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत राज ठाकरे यांनी त्या आंदोलनामुळे हजारो मराठी युवकांना रेल्वेत रोजगार मिळाल्याचा दावा केला. महाराष्ट्रातील रेल्वे भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे सांगत त्यांनी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या आणि पाणीगळतीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला की त्याला राजकारणाचे स्वरूप दिले जाते, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरही टीका केली.

राम मंदिरातील दानपेटीच्या निधीबाबत बोलताना, श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचा हिशेब मागणे म्हणजे धर्माचा अपमान नसल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी २००५ च्या महापुराचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

विकासाच्या संकल्पनेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत केवळ रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नसल्याचे सांगितले. शहर नियोजन, निकृष्ट दर्जाची सार्वजनिक कामे आणि कंत्राटी व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारावरही त्यांनी निशाणा साधला.

भाषणाच्या शेवटी त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निवडणूक पराभवाचा दाखला देत लोकशाहीत जनतेचे सर्वोच्च स्थान असल्याचे सांगितले. तसेच समाज केवळ सुशिक्षित नव्हे, तर सुज्ञ असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात