ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशात पुन्हा कमळ; ही आहेत भाजपच्या यशाची ५ कारणं

गेल्याच आठवड्यात आपल्या मूळगावातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, मी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा आणेन. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करता यावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशात चांगला प्रचारही केला होता. मध्य प्रदेशात भाजपच्या यशामागील कारण नेमकं काय आहे?

मध्य प्रदेशात भाजपच्या यशाची ५ कारणं

  • मध्य प्रदेशातील अर्ध्या लोकसंख्येसाठी शिवराज सरकारने ‘लाडली बहना’ योजना आणली आणि निवडणुकीच्या वर्षात शिवराज चौहानांचा हा मास्टर स्ट्रोक मानला गेला. काँग्रेसने याच्याविरोधात नारी सन्मान योजनेची घोषणा केली. ज्यात महिलांना १५०० रुपये देण्याचं सांगण्यात आलं. भाजपने पलटवार करीत दिले जाणारे १००० रुपये ३००० रुपयांपर्यंत पर्यंत करण्याचं जाहीर केले. यानंतर पुढील १०० दिवसात सव्वा कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले.
  • आदिवासी मतं
    देशातील सर्वात मोठी आदिवासींची लोकसंख्या मध्यप्रदेशात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांचे मत निर्णायक असतात. ८४ जागांवर आदिवासी मतदारांमध्ये कोणालाही जिंकण्याची किंवा पराभूत करण्याची क्षमता आहे. २०१८ च्या निवडणुकीत आदिवासींची नाराजी भाजपवर भारी पडली होती. गेल्या दोन वर्षांत गोंड राणी कमलापती, दुर्गावती, तंट्या मामा यांच्या माध्यमातून आदिवासींची मते आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वत: नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची सुरुवात केली. तर दुसरीकडे काँग्रेस सातत्याने आदिवासींवरील अत्याचाराचा मुद्दा पुढे करीत आहेत.
  • शिवराज चौहानांचं ‘राज’
    यंदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली नव्हती. पहिल्या दोन उमेदवार यादीत शिवराजांचं नाव भाजपने जाहीर केलं नाही. त्यामुळे शिवराज चौहान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तर सोडा तिकीटही देण्यात येणार नसल्याची भविष्यवाणी अनेकांनी केली. मात्र तिसऱ्या यादीत त्यांचं नाव आल्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. शिवराज विरूद्ध कमलनाथ यांच्यातील संघर्षात शिवराज चौहान भारी पडले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ६३४ हून जास्त सभांच्या माध्यमातून प्रचार केला तर काँग्रेसच्या नेत्यांनी ३५० सभा घेतल्या. याशिवाय भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांनी प्रचार केला. दुसरीकडे काँग्रेससाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह यांनी जोरदार प्रचार केला. तर एकट्या शिवराज यांनी १६५ रॅली, रोज शो करीत जनतेला कल पक्षाच्या पारड्यात टाकला.
  • कमकुवत जागांवर अधिक जोर
    १७ ऑगस्ट रोजी भाजपने विधानसभा निवडणुकींसाठी आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा केली. ३९ दिवसानंतंर ३९ मजबूत उमेदवारांची दुसऱ्या यादीची घोषणा केली. ज्यात तीन केंद्रीय मंत्री, नरसिंहपूरहून प्रल्हाद सिंह पटेल, कृषी मंत्री आणि पक्षाचे राज्य निवडणूक प्रबंधन समितीचे प्रमुख नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, फग्गन सिंह कुलस्ते सारख्या दिग्गजांच्या नावाचा समावेश होते. पक्षाने कमकुवत मानल्या जाणाऱ्या या जागांवर महिनाभरापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली होती. आधीच तिकीट मिळाल्यामुळे उमेदवारांना आपला जम बसवण्यासाठी वेळ मिळाला. याशिवाय तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आलं होतं.
  • मोदी-शहांची जादू
    मोदींच्या हमीभावाचा नारा देत पंतप्रधानांनी प्रचाराच्या शेवटच्या षटकांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल पत्र लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या कामामुळे आणि लाडली बहीण योजना आणि लाडली लक्ष्मी योजनेत आणलेल्या बदलांचाही उल्लेख केला आहे. भाजपच्या विरोधात 18 वर्षांची सत्ताविरोधी लाट असल्याचे बोलले जात होते पण 15 सभा घेऊन मोदींनी भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण केले. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी मध्य प्रदेशात अनेक सभा आणि रोड शो घेतले. परिणामी निवडणूक निकालाचं चित्रच पालटलं.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे