ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसवाल्यांनो, परत येऊन रडलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इशारा

नांदेड

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या नांदेड येथे सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह इंडिया आघाडीवर निशाणा साधला.

तुम्हाला संधी दिली होती, पुन्हा रडत येऊ नका… पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, दिल्लीतील एक व्यक्ती आहे जी भारत जोडो यात्रेवर निघाली आहे. मात्र भारत जोडण्यापूर्वी आधी जातीव्यवस्था तोडावी लागते. त्यासाठी आंबेडरवाद आणि बाबासाहेबांना जवळ घ्यावं लागतं.

सुजात आंबेडकर यांनी राहुल गांधीवरही टीका केली. राहुल गांधी यांना द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडाचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रेमाचं दुकान छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरममध्ये उघडणार असल्याचं ते म्हटले होते. मात्र, छत्तीसगड, राजस्थानमध्ये असलेले दुकान बंद पडलं. तर, मध्य प्रदेशमध्ये दुकान उघडण्याचीही संधी दिली गेली नाही.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात