ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलकांची उद्या निर्णायक बैठक, दुपारपर्यंत रास्तारोको नंतर धरणे आंदोलन

जालना

आज गावागावत होणारं रास्ता रोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. नाशिकमध्ये बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे रास्ता रोको न करता गावांत धरणे आंदोलन करण्याचं आवाहन मराठा बांधवांना करण्यात आलं आहे. त्याशिवाय मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना अडचण नको म्हणून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

राज्य सरकारकडून रडीचा डाव खेळला जात आहे. राज्यात तीन राजे असतानाही एकालाही जनतेवर दया नाही, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. उद्या २५ फेब्रुवारी रोजी मराठा बांधवांशी बोलून काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांपे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

मला हरवण्यासाठी काय डाव आखले उद्या सांगणार, असे म्हणत जरांगे पाटलांनी सूचक विधान केले आहे. तर मराठा समाजाला विचारल्याशिवाय काहीच निर्णय घेणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. सरकारने एक पाऊल मागे येऊन जनतेशी चर्चा करावी, 10 टक्के आरक्षण घेतले नाही म्हणून सरकार जनतेस वेठीस धरत आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात