X: @therajkaran
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत (Mumbai) मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Sarkar) हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 400 जागा निवडून आणणार अशी घोषणा केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागतील. यात लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. ४०० मधून ४८ गेले की ३५२ राहतात. त्यामुळे मोदींच्या 48 जागा आपण कमी करायच्या ही आपली जबाबदारी आहे, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे.
जेवढ्या ताकदीने आपण या निवडणुकीत उतरू, तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष आणि समूह भाजपच्या (BJP) विरोधात आहे, तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या, विचारांची लढाई आपण उभी करतोय. आपण बघत असाल की, मोदी घराणेशाही काढत आहे आणि म्हणतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे. मोदी कितीही वल्गना करत असले की, मी ४०० जागा जिंकणार आहे, पण आतली गोष्ट सांगतो की, ते पूर्णपणे कोसळले आहेत, तो माणूस घाबरलेला आहे, अशा शब्दात आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
या लोकसभा निवडणुकीत मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना (Rahul Gadhi ) पुढं करू नका, तर प्रियंकाला (Priyanka Gadhi) पुढे करा, ती बरोबर त्याचे ४ – ५ वाजवत असते असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला (Congress) दिला.