ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले मतदारसंघात नवा ट्विस्ट ; शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला आहे . शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे .. यावेळी त्यांनी स्वत: हातकणंगलेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

याआधी या हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhayirsheeil mane), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) तर वंचितकडून दादागौडा पाटील मैदानात आहेत. अशातच आता रघुनाथदादा पाटील यांनीदेखील निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात एकूण 5 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील वर्षभर भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षासह (BJP) त्यांचे जुने सहकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetti)यांच्यावर निशाणा साधला आहे . राजू शेट्टी यांनी मागील हंगामात ऊस दरासाठी केलेलं आंदोलन निरर्थक असल्याचं म्हणत त्यांनी शेट्टींवर हल्लाबोल केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागा पार करता येणार नाहीत. कारण सामान्य जनता भाजपच्या कारभारावर नाराज असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे . तसेच भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं म्हणाले आहेत . दरम्यान या मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत रंगणार असल्याने बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात