महाराष्ट्र ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून अबू आझमी निलंबित, आमदारकी रद्द करण्याची मागणी

मुंबई: बुधवार – ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाची विधानसभेत घोषणा करण्यात आली. क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याच्या आरोपावरून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमी यांच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडला, जो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतांस टाकून एकमताने संमत केला.

आझमी यांना फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले, मात्र भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. यावर संसदीय कार्यमंत्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी निलंबनाला स्थगिती दिली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आझमी यांची आमदारकी रद्द करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात