ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आता अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का?’

मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांची मूट बांधण्याचं काम सुरू असताना पक्षांमधील Out Going थांबवणं अशक्य होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यावर आता संजय राऊतांनी भीती वाढवणारी शक्यता व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे आता अशोक चव्हाणदेखील काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशोक चव्हाण ११ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्वत: जाहीर केलं.

संजय राऊत काय म्हणाले?
अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!

हे ही वाचा – विश्वजीत कदमदेखील काँग्रेस सोडणार? Video मधून दिली महत्त्वाची माहिती

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात