ताज्या बातम्या महाराष्ट्र

रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविलंना भाजपने मेरठमधून उतरवले रिंगणात

मुंबई : भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून(Meerut Loksabha) तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल ( Arun Govil)यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अरुण गोविल यांचे नाव मागील तीन आठवड्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर विजयाची हॅटट्रिक करणारे राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी अरुण गोविल यांना भाजपने रिंगणात का उतरवले आहे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टीव्ही मालिका रामायणचे राम अरुण गोविल यांचे मेरठशी नाते राहिले आहे. अरुण गोविल यांचा जन्म;१२ जानेवारी १९५२ रोजी मेरठमधील अग्रवाल कुटूंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश गोविल होते. त्यांचे वडील नगरपालिकेत जलविभागात अभियंता होते. अरुण यांच्या आईचे नाव शारदा देवी होते त्या गृहिणी होत्या.अरुण गोविल यांचे पाच भाऊ व दोन बहिणी होत्या. कॉलेजनंतर अरुण गोविल करिअरसाठी मुंबईला गेले. तेथे ते आपला भाऊ विजय गोविल यांच्याकडे राहिले. त्यांची वहिणी तबस्सुम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव होते. अनेक चित्रपटात काम केल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायणमधील ‘राम’ भूमिकेसाठी अरुण गोविल यांना निवडले. त्यानंतर ते राम नावाने प्रसिद्ध झाले. कडून त्यानंतर आता ते भाजपकडून मेरठ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान राजेंद्र अग्रवाल(Rajendra Agrawal) यांच्यामुळेच भाजपने २००९ मध्ये ही जाहा बसपाकडून हिसकावून घेतली होती. २००४ मध्ये बसपाचे शाहिद अखलाक येथे खासदार होते. त्यानंतर २०१४ मध्येही राजेंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्यांना विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी विजयाची हॅटट्रिक  केली. मात्र आता २०२४ मध्ये राजेद्र अग्रवाल यांच्या जागी’ अरुण गोविल यांना तिकीट दिली आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात