महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : मुंबई महापालिका निवडणूक: भाजपचा ‘स्वबळाचा नारा’; शिंदेसेना युतीसाठी आतुर, फडणवीसांनी दिला ‘एकला चलो रे’ संदेश

राज्य निवडणुका जाहीर होण्याच्या हालचालीदरम्यान भाजपचा मुंबईत स्वबळाचा निर्धार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी प्रयत्नशील.

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पालघर आणि इतर मोजक्या नगरपालिकांमध्ये ‘स्वबळावर लढण्याचा’ नारा दिला आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नगण्य असल्याने, अनेक स्थानिक भाजप नेत्यांनी “युती नको” अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भूमिकेला तत्त्वतः मान्यता दिली असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

शिंदे यांच्या विस्तारवादी धोरणामुळे अनेक स्थानिक भाजप नेत्यांमध्ये असंतोष असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन वर्षांत मुंबई-ठाण्यातील कार्यकर्त्यांना मानसिक त्रास झाल्याचा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील ‘मनांची युती’ अद्याप झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे भाजपसोबत युती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी “एकला चलो रे”चा मंत्र घेतला असून फडणवीस यांनी त्यांना थेट पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्याच्या घोषणेने शिंदे गोट्यात खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या गटाने हा विषय दुर्लक्षिला असला तरी, एका सर्वेक्षणानुसार मुंबईत शिंदे गटाला फटका बसू शकतो, तर ठाण्यात अंतर्गत नाराजीचा फटका भाजप-शिंदेसेनेच्या समीकरणांवर पडण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ठाणे मनपा निवडणुकीत भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यात ‘अंतर्गत समन्वय’ तयार झाला आहे, ज्यामुळे शिंदे गट चिंतेत आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात