महाराष्ट्र

… पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही: एकनाथ शिंदे

X: @therajkaran

मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही. आमच्या काळात आधीही आमच्यावर आरोप होत होते. आता निर्जीव इएमव्हीवर होत आहेत, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना केली.

आपण आम्हाला न्याय दिलात आणि जनतेनेही मतदानात तोच निर्णय दिला, असेही शिंदे म्हणाले. असे हे अध्यक्ष म्हणजे सभागृहाचा साक्षात ‘कोहिनूर’ आहेत या शब्दांत गौरव केला.

ते म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्त्व. सभागृहात प्रत्येक सदस्याला समान न्याय आणि समान वागणूक देतात. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा त्यांना मान मिळाला आहे. विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपल्या शैलीत विरोधी पक्षाला शाब्दिक चिमटे घेतले. लोकसभा निवडणूक निकालानंतर इव्हिएम म्हणजे गार गार वाटत होते. मग आता असं का? आम्हाला लाडक्या बहिणींनी येथे बसवले आहे, आपला करेक्ट कार्यक्रम झाला हे आता तरी मान्य करा! राहुल नार्वेकर यांनी संयम न सोडता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही बाजूचा अभ्यास करून न्याय दिला. अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मन: पूर्वक अभिनंदन, असे अजित पवार म्हणाले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात