ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागेश्वरी नदीवर पूल बांधण्याची मागणी – खाडी किनाऱ्यावरील गावांसाठी जीवनरेखा

महाड : महाड तालुक्यातील खाडेपट्टा विभागातील नागेश्वरी नदीवर वामने येथे पूल बांधण्याची जोरदार मागणी होत आहे. हा पूल झाल्यास सुमारे 18 गावांतील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रिहान देशमुख यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे महाड येथील नियोजित दौऱ्यात निवेदन सादर केले.

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील अप्पर तुढील, कुंबळे, लोअर तुढील, खुटील, आडे, जुई, खैरे, वलंग, ओवळे, चिंबावे, तेलंगे, वराठी, गोमेंढी आदी गावांतील नागरिक वारंवार वामने रेल्वे स्थानकावरून मुंबई व रत्नागिरीला प्रवास करतात. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे त्यांना मोठ्या अंतराने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडतो.

सध्या नागरिकांना रिक्षाने 10-12 किमी प्रवासासाठी 300 ते 400 रुपये भाडे द्यावे लागते, तर मुंबईला जाण्यासाठी रेल्वे तिकीट फक्त 50 रुपये आहे. ही असमान खर्च तफावत लक्षात घेता, पूल झाल्यास नागरिकांचा वाहतुकीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.

नागेश्वरी नदीवर पूल झाल्यास बंधारा बांधता येईल, ज्यामुळे भरतीच्या वेळी एमआयडीसीचे दूषित सांडपाणी नदीत येणे थांबेल. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासह स्थानिकांचा आरोग्यविषयक प्रश्नही सुटू शकतो.

या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रेहान देशमुख, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, महेश सावंत यांनी महाड दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन दिले.

गावकऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि पूल बांधणीला गती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात