महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुरक्षा कपातीमुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी?

मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले आहेत. प्रशासनाने ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. काहींची सुरक्षा श्रेणी कमी करण्यात आली असून काहींच्या अंगरक्षकांची संख्या कमी केली गेली आहे. मात्र, शिवसेनेतील काही नेत्यांनी अजूनही संभाव्य धोका असल्याचा दावा करत, त्यांची सुरक्षा पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हे निर्णय राजकीय हेतूने घेतले जात असल्याचे आरोप केले असून विरोधकांनीही सरकारवर टीका करत, “राजकीय सत्तेचा वापर करून ठरावीक नेत्यांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

मात्र, सुरक्षा कपातीवर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, याच मुद्द्यावरून येणाऱ्या काही दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात