ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उमेदवार यादी जाहीर आणि ठाकरेंच्या उमेदवाराला ईडीचं समन्स, काय आहे प्रकरण?

मुंबई – महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अमोल कीर्तिकर लागलीच अडचणीत आल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात त्यांना ईडीचं समन्स जारी करण्यात आल्याची माहिती आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे याच मतदारसंघातून खासदार आहेत, मात्र ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध गजानन कीर्तिकर यांच्यात लढत होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मुलासमोर निवडणूक लढवण्यास गजानन कीर्तिकर यांनी नकार दिलाय. कीर्तिकर यांच्यासमोर आता महायुतीत कोण उमेदवार देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.

खिचडी घोटाळा प्रकरण काय ?

कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांना वाटप करण्यात आलेल्या खिचडीच्या कंत्राटात फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात आवश्यकतांची पूर्तता नसतानाही काही कंत्राटं आणि उपकंत्राटं देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणात सुजित पाटकर, राजू साळुंखे, बाळा कदम असे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई उत्तर पश्चिममधून रिंगणात उतरलेल्या अमोल कीर्तिकर यांच्यासमोरच्या अडचणी यामुळं वाढणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा आणि महायुतीकडून होतोय असा आरोप मविआ नेते सातत्यानं करतायेत. त्यातच आता कीर्तिकरांना ईडीचं समन्स आल्यानं हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात