महाराष्ट्र ताज्या बातम्या

मध्यान्ह भोजनातून विषबाधा; सरकारला धरले धारेवर

X: @therajkaran

नागपूर: राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम पंचवीस जिल्ह्यांत पूर्ण झाले आहे. या महिनाअखेर ते सर्व जिल्ह्यांत पूर्ण होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चेंबूर, मुंबई येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा या संबंधीच्या प्रश्नाला प्रश्नोत्तर तासात दिले. यावेळी गृहविभागाकडून फोरेन्सिक अहवाल शिघ्रातिशिघ्र मागवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

अबू आझमी यांनी आणिक गाव, चेंबूर येथील महापालिका शाळेतील १६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यांची ऐपत आहे ते विद्यार्थी हे भोजन घेत नाहीत. मात्र गरीब मुलांना पर्याय नसतो. सबब सदर घटनेची चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी यांनी केली.

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे काम काढून घेतले आहे व गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदस्यांचे समाधान होत नव्हते. कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड यांनी आक्रमकपणे विषय लावून धरला. घाटकोपर येथेही भोजनात अळ्या सापडल्या. मंत्री महोदयांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी. विद्यार्थ्यांसाठी २७ वस्तूंची खरेदी होते पण त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाही, याकडे वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधले.

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी आपण स्वतः मध्यवर्ती भोजन निर्मिती केंद्रास भेट देऊ. ग्रामीण भागात जे नियम आहेत तेच शहरांतही लागू करू असे स्पष्ट केले. मनिषा चौधरी, अशोक चव्हाण यांनीही उपप्रश्न विचारले.

Also Read: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात