महाराष्ट्र

कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी – अंबादास दानवे

नागपूर: राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले असून गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

“राज्यात 45,000 महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्ह्यांतील वाढ, तसेच नागपुरात अधिवेशनाच्या दरम्यान गोळीबारासारख्या घटना होत आहेत. गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला जातोय, तर पोलीस बळाचा दुरुपयोग करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे,” असे ते म्हणाले.

माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपासून ते नागपुरात मंत्री मुलाला अटक न होणे, रोहिंग्यांचा पुण्यात वावर, तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, हे सारे कायदा-सुव्यवस्थेचे अपयश आहे. “सत्ताधाऱ्यांनाही संरक्षण मिळत नाही, तर सामान्य जनतेची काय स्थिती असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रांत अकार्यक्षमता असल्याचा आरोप करत दानवे म्हणाले, “ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. फूड अँड ड्रग्स विभाग यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला आहे.”

दानवे यांनी सरकारकडून तातडीने सुधारणा आणि कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात