ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा : मंत्री मंगल प्रभात लोढा 

X : @NalavadeAnant

नागपूर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान बुधवारी येथे दिले.

अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी आज सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही चुकीचं केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचंही मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलं. मंत्री लोढा म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय (Illegal business) होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो. आम्ही एकही अनधिकृत बांधकाम (illegal construction) केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा गैरवापर करत नाही. तुम्ही पुरावे द्या, ते घेण्यासाठी मी स्वतः येतो. हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कोणाच्या कुटुंबाने कोणता व्यवसाय, नोकरी काही करायचाच नाही का? बेरोजगार बसून राहायचा का? माझं काम अतिशय पारदर्शक आहे, कुणी १ रूपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही!” असे जाहीर आव्हानच लोढा यांनी दानवे यांना दिले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात