राष्ट्रीय ताज्या बातम्या

इराण युद्धामुळे भारतीय शेती व निर्यातीवर संकट; शेतकऱ्यांसाठी दिलासा पॅकेज जाहीर करण्याची AIKS ची मागणी

नवी दिल्ली : इराणवरील अमेरिकन-इस्त्रायली लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती आणि कृषी निर्यातीवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) केंद्र सरकारकडे तातडीने सर्वसमावेशक दिलासा पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

AIKS ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आणि तेल पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट फटका भारतीय शेतकरी, कृषी निर्यातदार आणि कृषी मजुरांना बसत आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ८४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. तेलाच्या किमती वाढल्यास खत उत्पादनाचा खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होऊ शकतो.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ हार्मोज मार्गावरील सागरी वाहतूक अडथळ्यांत आल्याने भारताच्या कृषी निर्यातीवरही परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

AIKS च्या मते, या परिस्थितीमुळे अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. बासमती तांदूळ, केळी, द्राक्षे, कांदे आणि पोल्ट्री उत्पादनांवर त्याचा परिणाम होत असून अनेक कंटेनर बंदरांवर अडकून पडल्याचे सांगितले जात आहे.

संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार,

• सुमारे ४ लाख टन बासमती तांदूळ निर्यातीसाठी अडकला आहे.

• सोलापूरमधील १२०० कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली आहेत.

• ६ हजार टन द्राक्षे निर्यातीअभावी धोक्यात असल्याचे सांगितले जाते.

• नाशिकचे ५४०० टन कांदे बंदरांवर अडकले आहेत.

• आखाती देशांकडे जाणारी दररोजची अंडी निर्यातही प्रभावित झाल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर AIKS ने केंद्र सरकारकडे काही तातडीच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची आपत्कालीन आर्थिक मदत, अडकलेले कृषी उत्पादन सरकारी यंत्रणांकडून खरेदी करणे, बंदर शुल्क माफी, तसेच शेतकऱ्यांच्या कर्जांवर स्थगिती देणे यांचा समावेश आहे.

तसेच संघटनेने दीर्घकालीन धोरणात्मक पातळीवर कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय व्यापार करारांपासून संरक्षण देण्याची आणि युद्धजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी स्पष्ट धोरण आखण्याची मागणी केली आहे.

AIKS ने इराणवरील लष्करी कारवाईचा निषेध करत या संघर्षाचा परिणाम भारतीय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचा आरोप केला आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे