ताज्या बातम्या महाराष्ट्र

नारायण राणेंना लिड मिळाले नाही तर हिशोब करणार, नितेश राणेंचा सिंधुदुर्गात सरपंचांना इशारा

मुंबई- रत्नागिरी सिँधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नारायण राणे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघातून नारायण राणेंना निवडून देण्यासाठी त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश हेही ठिकठिकाणी प्रचारसभा घेतायेत. त्यातल्या एका सभेत राणेंना मोठ्या लिडनं विजयी करा, असं आवाहन नितेश राणेंनी केलं. मात्र लिड कमी मिळेल त्या ठिकाणी विकास निधी कमी मिळाला तर मग तक्रार करु नका, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावर आता टीकेची झोड उठताना दिसतेय.

राणेंना विजय पाहिजे म्हणजे पाहिजेच

गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नितेश राणे बोलत असताना त्यांनी ही इशाऱ्याची भाषा केली आहे. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी गेल्या निवडमुकीवेळी जी यंत्रणा राबवली होती, तीच यंत्रणा राबवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. येत्या ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी सगळ्यांचा हिशोब होणार असल्याचं विधानंही त्यांनी केलंय. हवं तसं लिड राणेंना मिळालं नाही तर विकास निधी कमी मिळाल्याची तक्रार करु नका, असा सज्जड दमच त्यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दिलाय. नारायण राणे यांचा विजय झालाच पाहिजे, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतलीय.

मोदींना पंतप्रधान करण्याची घाई

तर याच सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदारांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची घाई असल्याचं विधान केलंय. मोदींच्या बाजूनं वन साीड मतदान या निवडणुकीत होईल असं भाकितही त्यांनी वर्तवलेलं आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात