ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने 18 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘अल्पसंख्याक विश्वास मेळावा’ १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवी मुंबई) इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने षण्मुखानंद सभागृहात भव्य महिला मेळावा झाला आणि त्यानंतर युवा मिशन मेळावा पुणे बालेवाडी इथे पार पडला. आता ‘अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालोद्दीन, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी या विश्वास मेळाव्याला राज्यातील सर्व अल्पसंख्याक समाजातील लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक सेलचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, राज्य कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी केले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात