ताज्या बातम्या महाराष्ट्र

अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक तर विरोधक शांत

मुंबई : मोगल राजा औरंगजेब हा एक कुशल प्रशासक होता” अशा शब्दांत सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सपा आ. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. सत्ताधारी सदस्यांनी आझमी यांच्या निलंबनाची मागणी आक्रमकपणे लावून धरल्याने झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दहा मिनिट तर नंतर अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्नांची सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर तर शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

आज आझमी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर खरेतर विरोधी पक्ष आक्रमक होईल असे सर्वांनाच वाटत असताना विरोधी बाकावरचे आमदार मात्र शांत बसून होते. परंतु कोणतीही अपेक्षा नसताना अचानक यावर सत्ताधारी आमदारच आक्रमक होत गोंधळ घालू लागले. विधानसभेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली असताही, सत्ताधारी पक्षाने गदारोळ केल्याने उपस्थित सर्वच जण अचंबित झाले. मात्र हाच मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी लावून धरत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सभागृहातील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने आझमी यांच्या निलंबनाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात