महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला धक्का : दिलीप सानंदा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

X: @therajkaran

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. असे एकापाठोपाठ एक धक्के काँग्रेसला बसत असतानाच आता परत एक नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

काँग्रेसचे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Former Mla of Khamgaon to join Bjp) गेल्या अनेक दिवसापासून दिलीप सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.

दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हापासून ते सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले. मात्र २०१४ साली मोदी लाटेत भाजपचे आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी त्यांचा पराभव केला आणि २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सक्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात