महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sanjay Raut : रामटेकमध्ये कॉँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना लढेल : संजय राऊत 

X: therajkaran

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल आहे. लोहा लोहे को काटता है, हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआयसह सत्ता येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष (BJP) संपलेला असेल, अशा शब्दांत गंभीर इशारा राऊतांनी दिला आहे. 

राऊत यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकावे, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा” असेही राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष आहे, त्यांच्याकडे स्वतःची पोरं नाहीत. ते सर्व आमची फोडलेली पोरं घेऊन ते बसले आहेत. भाजपाने स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवावेत, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नये, नाहीतर ते पुन्हा पळून जातील, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर जागावाटप बद्दल बोलताना ते म्हणाले, जागावाटप संपलेले आहे. नेहरू सेंटरमध्ये आम्ही सर्वजण होतो. फायनल कागद तयार झाला, त्यामध्ये रामटेकची जागा काँग्रेसला निश्चित झालेली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूर ही आमची सिटींग जागा आहे. चंद्रहार पाटील उमेदवार घोषित केले आहे. या विद्यमान असलेल्या जागेवर चंद्रहार पाटील या डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेस चर्चा करत आहे. ते कालच्या सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात