महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो; पण दोन पक्ष फोडूनच”: देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा 

X: @therajkaran

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवर विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र येताना दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो… असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी चिन्ह होती. परंतु, अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना (Shivs sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी( NCP) पक्ष एकत्र आले. अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकार चालवलं. परंतु, जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर लागलीच वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फोडून मी पुन्हा आलो असं फडणवीस म्हणाले.

सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यशासारखे काहीही यशस्वी होत नाही, असं म्हटलं जातं. मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. आम्ही निवडून आलो. पण आमचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरुच राहतं”, असं फडणवीस म्हणाले. 

 दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा हा व्हीडिओ शेअर करत विरोधकांनीही टीका केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राज्यातील पक्ष आणि कुटुंबं फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती. पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. पण फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची निती राबवणाऱ्या भाजपाला (BJP) राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!” असे त्यांनी सांगितले.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात